नाशिक | प्रतिनिधी | Naashik
आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले...
घटनास्थळी जळलेल्या बसच्या आतून पंचनामा करत असताना बसमधील सीटखाली आणखी दोन मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. अपघात झालेल्या स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांचीदेखील मुख्यमंत्री भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.