नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीसमोरील सिग्नलवर काल पहाटे पाच वाजता यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस आणि अमृतधामकडून नाशिकरोडकडे जाणारा कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. यानंतर बसने अचानक पेट घेतला….
- Advertisement -
या आगीत बारा प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले, तर उर्वरित प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १२ मृतांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे.
नाशकात मृत्यूचं तांडव! अपघातानंतर बसने घेतला पेट, दुर्घटनेचा भयावह व्हिडीओ आला समोर
आता या प्रकरणातील ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. आडगाव पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. रामजी यादव (उत्तर प्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे.