नाशिक | निशिकांत पाटील
आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला. यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले.
- Advertisement -
ओळख पटलेले मृत व्यक्तींची यादी
१) अजय मोहन कुचनकार – (१६,रा. मारेगांव मागारु, ता. वणी जि. यवतमाळ),
२) उदध्व भिलंग ( ४४, रा. परोडी, ता. मालेगांव, जि. वाशीम),
३) लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर ( ५०, रा. विधी ता. लोणार, जि. बुलढाणा),
४) कल्याणी आकाश मुधोळकर (०३, मुलगी रा. विधी ता. लोणार, जि. बुलढाणा),
५) शंकर मोहन उचनकार(१८,रा. मारेगाव, मागरू, ता. वणी, जि. यवतमाळ),
६) साहिल जितेंद्र चंद्रशंकर(१५,रा. सावली, ता. माळेगाव, जि. वाशीम)
७) पार्वती नागराव मुधोळकर(४५,रा. विधी, ता. लोणार, जि. बुलढाणा)