नाशिक | प्रतिनिधी | Naashik
आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले.
घटनास्थळी जळलेल्या बसच्या आतून पंचनामा करत असताना बसमधील सीटखाली आणखी दोन मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालायामार्फत ज्या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत त्या रुग्णांची यादी जाहीर करण्यात आली आहे.