नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आज पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ जण जखमी झाले आहेत.
- Advertisement -
नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत हेमंत गोडसे, गिरीश महाजन, दादा भुसे, सुहास कांदे, डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, देवयानी फरांदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित आहेत.
नाशकात मृत्यूचं तांडव! अपघातानंतर बसने घेतला पेट, दुर्घटनेचा भयावह व्हिडीओ आला समोर
जखमींना उपचार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्यात येईल. जखमींचा संपूर्ण खर्च शासन करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.