नाशिक | प्रतिनिधी
हमीभाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शेतकरी विरोधी कायदा रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा करत केंद्र सरकारविरोधात आक्रोश नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व्यक्त करण्यात आला…
- Advertisement -
यावेळी बाजार समितीचे सभापती आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कायद्याला विरोध करण्यासाठी पाच किलो मालदेखील आज बाजार समितीमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे हा कायदा सरकारने विशेष अधिवेशन बोलवून रद्द केला पाहिजे असे मत पिंगळे यांनी मांडले.