Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याजळगावच्या खासदारांवर काय कारवाई केली ?

जळगावच्या खासदारांवर काय कारवाई केली ?

मुंबई – Mumbai :

मुंबईत निवृत्त नौदल अधिकार्‍याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणार्‍या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही.

- Advertisement -

सैनिकांप्रती त्यांना खरा आदर असता तर जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते.

त्यांच्यावर 2016 साली झालेल्या हल्ल्याची साधी दखलही फडणवीस सरकारने घेतली नाही या मारहाण प्रकरणात तेंव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेश पाटील यांच्यावर फडणवीस सरकारने काय कारवाई केली असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर 2016 साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करीत. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते. तेच गृहमंत्रीही होते, तरीही एफआयआर सुद्धा दाखल करून घेतला गेला नाही.

उच्च न्यायालयाने 2019 मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला परंतु आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा त्यांच्या आधीच्या संरक्षण मंत्र्यांनेही याची दखल घेतली नाही.

राजनाथसिंह सोनू महाजन यांच्यावरील हल्ल्याची दखल घेऊन फोन करणार आहेत का? सैनिका-सैनिकांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी भेदभाव का करावा ? असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या