Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याविद्यापीठाकडे पाचशेहून अधिक तक्रारी

विद्यापीठाकडे पाचशेहून अधिक तक्रारी

नाशिक । प्रतिनिधी

उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणर्‍या सर्व घटकांच्या विविध अडचणी, समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च शिक्षण मंत्रालय आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या पाचशेहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

- Advertisement -

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय म हा अभिनव उपक्रम कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली विभागापासून सुरू करण्यात आला असून त्याच धर्तीवर पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक प्रश्न सोडविले जात आहेत.

पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रश्न चर्चा करून सोडविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासह शिक्षण विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी विद्यापीठात उपस्थित होते. या उपक्रमासाठी तक्रारी किंवा प्रश्न स्वीकारण्यास विद्यापीठाने ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याअंतर्गत विद्यापीठाकडे 500 हून अधिक तक्रारी प्रात झाल्या.

त्यातील सुमारे 250 तक्रारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी व परीक्षेशी निगडीत होत्या. या सर्व तक्रारींचे निराकरण शिक्षण विभागाला करावे लागणार आहे. परंतु, एका दिवसात या सर्व तक्रारींना न्याय दिला जाऊ शकतो का? तसेच यावेळी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकूण घेणे शक्य होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या