राऊतांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra chawl land Scam) अटकेत (Arrested) असलेले शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांना आज १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर आता राऊतांना जामीन मिळाल्यावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aditya Thackeray)यांनी प्रतिक्रिया दिली आहे…

ते म्हणाले की, संजय राऊतांना जामीन (Bail Granted) मिळाला, याचा आनंद आहे. खरं बोलणारा प्रत्येक नागरिक या निर्णयाचे स्वागत करतो आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या देशात, राज्यात आपण हुकूमाशाहीच्या दिशेने जातो आहे का? यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, संजय राऊत हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक (Shiv Sainik) आहेत. ते उगाच मुखवटा लाऊन फिरत नाहीत. त्यांच्यावर दबावतंत्र वापरल्यानंतरही त्यांनी गद्दारी केली नाही. ते गुवाहाटीत (Guwahati) पळून गेले नाहीत आणि ते डरपोक नाहीत, हे आता लोकांसमोर आले आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *