
जालना | Jalana
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात आज मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले.