मुंबई –
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या
केलल्या निवडीचा वाद हायकोर्टात पोहचला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज गुरूवारी होत आहे.
ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. कुलगुरु निवडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. कुलगुरु निवडी प्रकरणी नोटीस काढण्यात आल्या असून आज 4 मार्चला सुनावणी होणार आहे. डॉ. एस.के.पाटील यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
डॉ.एस.के.पाटील यांनी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या निवडीबाबत आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात 3718/21 क्रमांकाची याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस.वी.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील यांच्यासह इतरांना नोटीस काढली आहे.