Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक नद्यांना पूर, मुंबईला ऑरेंज तर 'या' जिल्ह्यांना रेड...

राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक नद्यांना पूर, मुंबईला ऑरेंज तर ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई l Mumbai

जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने (Maharashtra Rains Update) जुलै महिन्यात दमदार आगमन केलं. राज्यातीव विविध भागात जोरदार पाऊस बसत आहे. प्रचंड पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर (Flood) आला आहे. गावं, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहे.

- Advertisement -

अशात हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या