'माती वाचवा' अभियानाला महाराष्ट्राचा पाठिंबा

'माती वाचवा' अभियानाला महाराष्ट्राचा पाठिंबा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ईशा फाऊंडेशनचे( Isha Foundation ) संस्थापक सद्गुरू ( Sadguru )ह्यांनी सुरु केलेले 'माती वाचावा अभियान' ( Save Soil Campaign )संपूर्ण राष्ट्रांमध्ये नागरिकांचे समर्थन सक्रिय आणि प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करते आणि मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि पुढील ऱ्हास थांबवण्यासाठी धोरण-आधारित कृती सुरू करण्यासाठी सरकारांना सक्षम करते. हे करण्यासाठी, ३.५ अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचे ह्या अभियानाचे उद्दिष्ट आहे. भारतातील 80 हून अधिक शहरांनी या वर्षीचा पृथ्वी दिवस ‘माती वाचवा’ या थीमसह साजरा केला, ज्याने सर्व स्तरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले गेले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कॅबिनेट मिनिस्टर एकनाथ शिंदे, मनसे आमदार नितीन सरदेसाई, बीज माता राहीबाई पोपेरे, अण्णा हजारे, भाजप आमदार अमित साठम, मुंबई अध्यक्षा अक्षता तेंडुलकर आदींचा सद्गुरूंच्या माती वाचवा अभियानाला मनःपूर्वक पाठिंबा

४ मे, मुंबई: “९५% अन्न उत्पादन मातीवर अवलंबून आहे. निरोगी माती आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे आणि आपण चिंताजनक दराने मातीचा वरचा सुपीक थर गमावत आहोत. माती वाचवणे म्हणजे संपूर्ण विश्वाचे रक्षण करणे आहे. मी सर्वांना हात जोडून सद्गुरू(@SadhguruJV) जींनी सुरू केलेल्या #SaveSoil अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो," माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका ट्विट मधून व्यक्त केले.

पक्षाच्या पलीकडे पाहून महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेते आणि प्रमुख व्यक्ती या सार्वत्रिक कारणासाठी नागरिकांनी आवाज बनावे असे आवाहन करत आहेत.

सीड मदर" या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहीबाई सोमा पोपेरे एका व्हिडीयो संदेशाने म्हणाल्या, "सद्गुरूजी, तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे, तुम्ही ज्या प्रकारचा प्रवास करत आहात, ते तुमच्याबद्दल नाही तर समाजाच्या अधिक भल्यासाठी आहे; जसे मी करत असलेले काम माझ्या किंवा माझ्या कुटुंबाचे नाही तर संपूर्ण समाजाचे आहे, तेच तुमच्याबाबतही खरे आहे. हे तरुण आणि वृद्ध, प्रत्येकाच्या सहभागाबद्दल आहे.

“या प्रवासात तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत; आपण सर्वांनी या अभियानासाठी मोठा आवाज उठवायचा आहे आणि समाजाला मोठा आवाज द्यायचा आहे त्यामुळे संपूर्ण समाजाने जागे झाले पाहिजे. सर्व शेतकऱ्यांनी उभे राहिले पाहिजे आणि प्रत्येकाने या अभियानात सामील झाले पाहिजे.”

राहीबाई सोमा पोपेरे - सामाजिक कार्यकर्त्या

भारतातील भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे चॅम्पियन म्हणून ओळखले जाणारे अण्णा हजारे ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी जल आणि माती संवर्धनाच्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर न करता जलस्त्रोतांच्या अतिशोषणावर प्रकाश टाकला होता, त्यांनीही ‘माती वाचवा’ ला पाठिंबा दिला.

अण्णा हजारे - सामाजिक कार्यकर्ते

चार वेळा आमदार आणि नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयात ‘माती वाचवा’ स्वयंसेवकांना भेटून सद्गुरूंना त्यांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे - शिवसेना

औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या एका शैक्षणिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘माती वाचवा’ स्वयंसेवकांसोबत फोटो काढताना दिसले. तर मुंबईत नुकत्यात आटपलेल्या आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेच्या (IAA) दि इंडिया चॅप्टरने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात, महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे ‘माती वाचवा’ फलक धारण करताना दिसले. मातीच्या वाळवंटीकरणाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या अपवादात्मक आणि अथक कार्याबद्दल सद्गुरूंना ह्या कार्यक्रमात प्रतिष्ठित ‘ग्रीन क्रुसेडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माती वाचवा स्वयंसेवकांनी वसुंधरा दिनाच्या निम्मित आयोजित केलेल्या शिवाजी पार्क कार्यक्रमात सहभागी होताना मनसेचे आमदार नितीन सरदेसाई सावध करत म्हणाले, “आपण जे काही करणार आहोत ते आजच करायला हवे. या फाऊंडेशनने जी जागरूकता निर्माण केली आहे तो खरोखरच एक चांगला उपक्रम आहे आणि मला आशा आहे की लोकांना लवकरात लवकर समजेल, अन्यथा अनर्थ निश्चित आहे.” सरदेसाईंसोबत त्यांचे सुपुत्र यश सुद्धा यावेळी उपस्थित होते.

नितीन सरदेसाई - मनसे

जुहू मतदारसंघातील भाजप आमदार साठम म्हणाले, “अनेक लोक हवामान बदल आणि पर्यावरणवादाबद्दल बोलतात परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक प्रत्यक्ष काम करतात. ईशा फाऊंडेशन आणि सद्गुरूजी यासाठी अप्रतिम कार्य करत आहेत. माझा पक्ष, मतदारसंघ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वतीने, सद्गुरूंनी मानवजातीच्या आणि निसर्गाच्या मोठ्या प्रमाणावर रक्षणासाठी हाती घेतलेल्या या महान अभियानाला मी आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य देऊ इच्छितो."

अमित साठम - भाजप

भाजपचे विरोधी पक्षनेते आणि पीसीएमसीचे नगरसेवक, नाना काटे शाळेतील मुलांनी मातीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करताना हाताने काढलेल्या चित्रांनी आणि संदेशांना पाहून भावुक झाले. काटे म्हणाले, “आपल्यापैकी प्रत्येकाचे मातीशी नाते आहे, जे आपण विसरलो आहोत”. हिंजवडी ही एके काळी कशी शेतजमीन होती याची आठवण करून देताना त्यांनी शहरात राहणाऱ्या मुलांना गावोगावी गेल्यावरच मातीची किंमत कळते असे सांगितले. "या मतदारसंघात पुढाकार घेतल्याबद्दल मी ‘माती वाचवा’ स्वयंसेवकांचे आभार मानतो आणि समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी या कार्याला पाठिंबा देण्याचे वचन देतो," असे ते पुढे म्हणाले.

नाना काटे - भाजप

मातीची झीज होण्यापासून वाचवण्यासाठी आसाममध्ये प्रत्यक्ष काम करणारे, PCMC चे पोलिस आयुक्त राजेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (IAS) आणि PCMC चे पन्नासहून अधिक विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांसोबत माती वाचवण्याची शपथ घेतली.

राजेश पाटील - IAS

PCMC अग्निशमन विभागासाठी आयोजित केलेल्या एका वेगळ्या कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक प्राप्त करणाऱ्या मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी अग्निशमन विभागातील सर्व प्रशिक्षण साहित्यात माती हा अनिवार्य विषय बनविण्याचा आग्रह धरला. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन शाश्वत उपक्रमांचा एक भाग म्हणून करण्यात आले होते.

एनजीओ, संस्था आणि प्रतिष्ठानांचे समर्थन

अशीच अजून एक शपथ भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या (The Indian Institute of Architects - IIA) सुमारे १३० सदस्यांनी महाराष्ट्र चॅप्टरच्या पुणे केंद्राचे अधिवेशन - महाकॉन २०२२ सत्रादरम्यान घेतली. या कार्यक्रमाला संपूर्ण भारतातील वास्तुविशारदांनी हजेरी लावली होती, ज्यांनी हे मान्य केले की स्थापत्य सर्वेक्षण आणि प्रकल्पांच्या परिणामी शहरी जागांमध्ये मातीच्या वरच्या सुपीक थराचे किमान नुकसान सुनिश्चित करणे ही त्यांचीही तितकीच जबाबदारी आहे.

महाराष्ट्र राज्याभरात सुरुवातीपासूनच माती वाचवा अभियानाला पाठिंबा दर्शविला जात आहे. कांदिवलीतील चिल्ड्रन्स अकादमी, पुण्यातील डीएव्ही पब्लिक स्कूल, आणि औरंगबादमधली श्री सरस्वती भुवन, या सारख्या राज्यातल्या तब्बल 425 शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माती वाचवण्यासाठी कृती करण्याची विनंती केली. आतापर्यंत तब्बल ८७,३९३ कागदी पत्रे आणि ६,५०० ई-पत्रे सादर केली गेली आहेत.

ह्या अभियानातर्फे एकट्या महाराष्ट्रात आत्ता पर्यंत किमान ४० NGO जोडले गेले आहेत आणि एप्रिलमध्ये मुंबईत झालेल्या मोठ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत ‘जल्लोश’ या संस्थेसोबत सहकार्य केले आहे. मुंबईतल्या मिठीबाई कॉलेज सारख्या अनेक महाविद्यालयांनी आणि कॉर्पोरेट्सनी या अभियानाचा एक भाग म्हणून ‘भूमित्र’ बनण्याची प्रतिज्ञा करण्यात भाग घेतला आणि मोहिमेचा एक भाग म्हणून संपर्क केलेल्या 410 प्रतिष्ठानांसह व्यापक लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा संदेश दिला.

‘माती वाचवा’ अभियानाला जगभरातून व्यापक समर्थन मिळाले आहे. कित्तेक राष्ट्रांनी धोरणांची अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता म्हणून ‘माती वाचवा’सोबत सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. यामध्ये अझरबैजान सारख्या राष्ट्रांनीही अलीकडे पाऊल उचलले. सद्गुरू पुढच्या आठवड्यात COP 15 ला उपस्थित असण्याऱ्या सरकारी मंत्री आणि उच्च-स्तरीय अधिकारी यांना संबोधित करतील जे एकत्र येऊन भविष्यात प्रगती करण्याच्या उद्देशाने माती विषयी निर्णय घेतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com