तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचल्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तासंघर्षांवर आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) लागणार असल्याचे जाहीर केले आहे. लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिल्याने न्यायालयाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे...
या निकालाकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे भवितव्य निश्चित करणारा, राज्य घटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतुदींची स्पष्टता देणारा आणि लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे.