मुंबईः
महाराष्ट्रात अनलॉक-४संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट्ट रद्द करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ई-पास रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. केंद्राने ई-पास रद्द केल्यानंतरही राज्यात सुरु असल्यामुळे सरकारवर टीका होत होती. या टीकेनंतर अखेर राज्य सरकारने ई-पास संदर्भात निर्णय घेतला. आता यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही.
काय सुरु? काय बंद
– हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत.
– मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत.
– महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.
-अंत्यविधी यासाठीदेखील २० पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही..
-शाळा आणि कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंदच.
-खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा.
– स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स बंदच
-५० पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही.