जळगाव
जळगाव मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ ला संपुष्टात आली आहे आहे. तेव्हापासून जवळपास २३७६ गाळेधारकांकडे थकबाकी आहे. मनपाकडून गाळे सीलची कारवाई सुरु होणार आहे. यामुळे मनपा मार्केट संघटनेने बंदचे आवाहन केले. या आवाहनास जळगावातील सर्वात मोठ्या मार्केटमधून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे १६ व्यापारी संकुलनातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला नाही.