<p>मुंबई</p><p>करोनामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गुरुवारी शेअर बाजारात टेन्शन वाढलेे. एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख (Rs 3.95 lakh crore) कोटींचे नुकसान झाले.</p>.<p>मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १११५ अंकांनी (Sensex plunged 1,115 points) घसरला आहे. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६ हजार ५५० अंकांवर स्थिरावला. ही परिस्थिती अगदी मार्च महिन्यासारखीच निर्माण झाली आहे.</p><p>गुरुवारी बाजारातील कंपन्यांचे मूल्य (listed companies stood) 1,48,76,217.22 कोटी झाले. कालच्या तुलनेत त्यात 3.95 लाख कोटींची घसरण आहे.</p>.<p><strong>बँकिंग, आयटी, ऑटो शेअर घसरले</strong></p><p>शेअर बाजारातील बीएसई इंडेक्सचे सगळे शेअर खाली आले होते. संपूर्ण कारभाराच्या शेवटच्या तासात इंडसइंड बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी घसरले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही टॉप लूझर्समध्ये होते. टाटा स्टील, इन्फोसिस, अँक्सिस बँक, मारुती,एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.</p>