नवी दिल्ली
भारतीय रेल्वे (Indian Railways) दिवाळी, दसऱ्यासाठी २० ऑक्टोंबरपासून ३९२ विशेष रेल्वे सुरु केल्या आहेत. या रेल्व २० ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान धावणार आहेत.
भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे फेस्टिवल स्पेशल ट्रेन (festival special trains) नावाने धावणार आहे. या रेल्वेसाठी स्पेशल ट्रेनसारखे भाडे आकारण्यात येणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी रेल्वेकडून १२ मे रोजी ३० स्पेशल राजधानी एक्सप्रेस रेल्वे तर १ जून पासून २०० मेल / एक्सप्रेस रेल्वे सुरू केल्या गेल्या आहेत. आता सणांमुळे रेल्वने सर्व झोनमध्ये (Zonal Railways) फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवण्यास मंजुरी दिली आहे. या रेल्वे ५५ किलोमीटर वेगाने धावणार आहेत. यातील काही रेल्वे नियमित असून काही आठवड्यात तीन, चार दिवस चालतील.