…अन् संशयातून चिमुकल्यांच्या डोळ्यांसमोरच त्याने संपवलं पत्नीला

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्यात सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या (Violence Against Women) घटना समोर येत असून किरकोळ कारणांमुळे गंभीर गुन्हे (Crime) घडत आहे. यामध्ये पती-पत्नीचे भांडण, जमिनीचे वाद यासारख्या घटनांचा समावेश आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातील (Palghar District) दांडी पाडा येथे घडली असून पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या (Murder) केली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ममता देवी प्रसाद (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचे नाव असून सीताराम प्रसाद (वय ४५) असे पतीचे नाव आहे. हे दोघे मुळचे उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) देवरिया जिल्ह्यातील (Deoria District) रहिवासी असून पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे.

Nashik : पतीच्या दशक्रियेला गेल्याने विधवा पत्नीच्या तोंडाला फासलं काळं; काय आहे प्रकरण?

आरोपी सीताराम प्रसाद हा पत्नी ममता देवी हिच्या चारित्र्यावर संशय (Character Doubts) घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यानंतर मंगळवार (दि.३१) रोजी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याने पती सीताराम याने मुलांच्या समोरच पत्नी ममता हिची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.

दरम्यान, या घटनेत ममताचा जागीच मृत्यू (Death) झाला असून पती सीताराम याने स्व:तावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

Nashik : ‘या’ भागात दोन बिबटे जेरबंद

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *