मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली. संपूर्ण देशात कडक उन्हाळा पाहायळा मिळत आहे. नाशिक शहरातील तापमानही ४० अंशाच्या जवळपास पोहचले आहे. यामुळे उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. परंतु आता यापासून दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने सात राज्यांसाठी ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
- Advertisement -
आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० व ३१ मार्च रोजी हा पाऊस होणार आहे. त्यामुळे कडक उन कमी होणार आहे. पुढील काही दिवस तापमान ४० डिग्रीच्या खाली राहील, असा अंदाज आहे.