किसान रेल्वेमध्ये शेतकऱ्यांना ५० टक्के सबसिडी; या शेतमालाचा असेल समावेश

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने (Indian Railways)शेतकऱ्यांसाठी महत्वाची पावले उचलली आहे. किसान रेल्वेमधून फळ, भाज्या पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे.

ऑपरेशन ग्रीन-टॉप टू टोटल (Operation Green-TOP to Total) योजनेत ५० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. त्यात कांदा, बटाटा, टॉमोटोसह सर्वच फळ भाज्यांचा समावेश केला आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात माहिती दिली. गोयल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात आपला माल नवीन बाजारात पाठवू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *