Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापेन्शनचं मिशन संपलं! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

पेन्शनचं मिशन संपलं! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई | Mumbai

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर आहेत. आज अखेर हा संप मिटला आहे.

- Advertisement -

सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

सासरच्यांनी छळले, विवाहितेने जीवन संपविले

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे.

भांडणं झाली… रिव्हाॅलवर काढलं… गोळीबार केला… ही काय मोगलाई आहे का? अजितदादा संतापले, पाहा VIDEO

मागील सात दिवसांपासून संपामुळे शिक्षण, रुग्णालय, महाविद्यालय, नगर पालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसील कार्यालय यांसह अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होते. संपामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील रखडले आहेत.

‘त्या’ ट्विटमुळं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या