Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रचांगली बातमी : राज्यात वीजदर कमी होणार

चांगली बातमी : राज्यात वीजदर कमी होणार

मुंबई/ प्रतिनिधी

वीज ग्राहकांमध्ये वाढीव वीज बिलांवरून असलेला असंतोष कमी करण्यासाठी ऊर्जा विभागाने आता विजेचे दर कमी करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार घरगुती वीज वापरासह वाणिज्य आणि औद्योगिक वीज दरात कपात करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी बुधवारी दिले.

- Advertisement -

याशिवाय शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने आपल्याकडे उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे. वीजदर किमान एक रुपया प्रति युनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सोबतच घरगुती तसेच वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश राऊत यांनी आज महावितरणला दिले.

नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषिपंप वीज वाहिन्या अतिभारीत (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे, रोहित्रांची संख्या आणि क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा आठ तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याची सूचना राऊत यांनी केली.

नवीन अपारंपरिक ऊर्जा धोरणांमुळे स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार असून यामुळे औद्योगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे. राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्याने स्वस्त वीजेची खरेदी करण्यासाठी आराखडा तयार करा, असेही राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या