नवी दिल्ली | New Delhi
तमिळनाडूमधील (Tamil Nadu) मदुराई जिल्ह्यातील (Madurai District) थिरुमंगलमजवळ कार आणि कंटेनरचा (Car and Container) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू (Death) झाला असून अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही…
मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात; काय आहे कारण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुराई येथील मस्तानपट्टी टोल प्लाझाजवळ ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वेगाने असणाऱ्या ट्रकने टोलवरील कर्मचाऱ्याला (Toll Worker) जोरदार धडक दिली. या धडकेत सतीश कुमार नावाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर पुढे जाऊन कंटेनर एका कारवर पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
खळबळजनक! मुंबईत धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार; ४ जणांचा मृत्यू
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, कारसह कंटेनरचा देखील यात चक्काचूर झाला आहे. तसेच अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत व्यक्तींची ओळख पटवली जात असल्याची माहिती मदुराई जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) शिव प्रसाद यांनी दिली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
संभाजी भिडे पुन्हा बरळले! महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका