Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्र सरकारकडून अखेर कांदाप्रश्नी हिरवा कंदिल

केंद्र सरकारकडून अखेर कांदाप्रश्नी हिरवा कंदिल

नाशिक । प्रतिनिधी

कांदा खरेदी करण्यासाठी साठवणूक क्षमता निर्धारित केली होती.

- Advertisement -

मात्र, आता त्याच्यासाठी नवीन मार्गदर्शिका तयार करण्यात आली असून कांदा खरेदी झाल्यापासून पुढील 3 दिवस कांदा प्रतवारी करून पुढे माल रवाना करण्यासाठी व्यापाऱ्यांना खा.डॉ.भारती पवार यांच्या पाठपुराव्यामुळे वाढीव मुदत मिळाली आहे.

याबाबत त्वरित अंमलबजावणी व्हावी , असे आदेश राज्य सरकारला केंद्र सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेल्या मालाची व्यवस्थित प्रतवारी करून तो माल पुढे रवाना करण्यास कुठलीही अडचण येणार नसून रोजचा माल खरेदी केलेल्या मालाला 3 दिवस अवधी स्टॉक लिमिटसाठी अधिकचा मिळणार आहे. असे खा.डॉ.भारती पवार यांनी सांगितले.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल , केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह आदींचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या