Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यापीक विमा संरक्षणासाठी वेळेत तक्रार दाखल करा- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

पीक विमा संरक्षणासाठी वेळेत तक्रार दाखल करा- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PM Crop Insurance Scheme)खरीप व रब्बी हंगाम 2022-23 करिता विमाक्षेत्र अधिसूचित करून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत पिकांच्या झालेल्या नुकसानीला विमा संरक्षण मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी संबंधित कंपनीच्या तालुका व जिल्हास्तरीय विमा प्रतिनिधींशी वेळेत संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016-17 हंगामापासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पिकांचे काढणी पश्चात व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानीसाठी पीक विमा संरक्षण देण्यात येणार असून यामध्ये पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादींमुळे उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेत खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्ष प्राप्त झाले असून जिल्ह्यात या योजनेंतर्गत 1 लाख 65 हजार 60 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला आहे.

हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांचे काढणीपश्चात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबींचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. याकरिता शेतकर्‍यांनी नियुक्त करण्यात आलेल्या एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कंपनीकडे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत पोर्टलवर तक्रार दाखल करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या