नवी दिल्ली :
शेतकरी आंदोलन नवव्या दिवशीही सुरु होते. शनिवारी होणाऱ्या बैठकीपुर्वी शेतकरी संघटनेने मंगळवारी (८ डिसेंबर) भारत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व टोल बंद करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे हरविंदर सिंह लखवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
- Advertisement -
दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेलं शेतकरी आंदोलन आता नवव्या दिवसात पोहचलं आहे.आंदोलन आता नवव्या दिवसात पोहचलं आहे. आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारने काल दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. उद्या ५ डिसेंबरला दुपारी दोन वाजता पुन्हा शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे. कोण किती मागे सरकतंय आणि तोडगा दृष्टीपथात आहे का याची उत्तर त्यानंतरच मिळतील.दरम्यान शेतकरी संघटनेने संपुर्ण दिल्लीत घेराव घालण्याची तयारी सुरु केली आहे.