मुंबई | Mumbai
रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) दापोली (Dapoli) तालुक्यातील हर्णे मार्गावर मॅजिक रिक्षा (वडाप गाडी) आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत….
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी प्रवासी वाहतूक करणारी टाटाची मॅजिक प्रवाशी रिक्षा दापोलीकडून हर्णेकडे जात होती. त्यावेळी समोरून येणारा ट्रक आणि टाटा मॅजिक रिक्षात जोरदार धडक झाली. यावेळी मॅजिक रिक्षात (वडाप गाडीत) १४ प्रवासी होते. हा अपघात इतका भीषण होता की, यात ८ जणांचा मृत्यू (Death) झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच अपघातामध्ये मॅजिक रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी (Dapoli Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारांसाठी सुरुवातीला दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही जणांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.