नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पंजाबमधील (Punjab) गडशंकर (Gadshankar) येथे एका भरधाव ट्रकने आठ जणांना चिरडल्याने भीषण अपघात घडला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत....
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, बुधवार (दि.१२) रोजी रात्री उशिरा सुमारे ५० भाविक (Devotee) बैसाखी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चरण छो गंगेच्या दिशेने चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले.
यामध्ये पाच जणांचा जागीच तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. तसेच मृतांमधील पाच जण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले असून सर्व मृत उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर येथील असल्याचे समजते.
दरम्यान, या अपघातानंतर (Accident) ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच येथील रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे रस्ते अपघातात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.