Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासरकार गेले म्हणून अजितदादांना रस्त्यावरचे खडडे दिसतात का ?

सरकार गेले म्हणून अजितदादांना रस्त्यावरचे खडडे दिसतात का ?

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस ( Rain ) कोसळतो आहे . त्यामुळे रस्त्यावर खडडे पडलेले ( Pits on Roads )दिसतात ही वस्तुस्थिती आहे . मात्र विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना महाविकास आघाडी सत्तेत होती , त्यावेळी खडडे दिसले नाहीत का त्यांच्याही काळात खडडे होते अन आताही आहे , फरक फक्त एवढाच आहे की , त्यावेळी ते खडडे दादांना दिसत नव्हते आता दिसतात , असा आरोप केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr.Bharti Pawar)यांनी केला.

- Advertisement -

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात वेगवेगळ्या चाळीस योजनांचा आढाव घेण्यासाठी ना . पवार यांची बैठक आयोजित केली होती . त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर आरोप केला . खडडयांबाबत बोलतांना त्यांनी सांगीतले की , प्रशासनाला खडडे बुजविण्याचे ओदश देण्यात आले आहेत . यासाठी निधीही कमी नाही , मात्र सतत पाऊस पडत असल्याने काही जागेवर खडडे बुजविण्यास अडसर निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगीतले .

दरम्यान आढाव बैठकीत वेगवेगळया चाळीस • योजनांचा आढाव घेतांना त्यांनी विभागात असलेल्या ऑक्सिन प्लॅन्टचा वापर खाजगी उद्योगासाठी करावा , अशी सूचना केली . कोठयावधीचा खर्च केलेल्या योजना धूळखात पडून असल्याने त्याचा सदउपयोग करण्याची सूचना केली . पोषण आहार योजनेत येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे किंवा नाही , याविषयी अधिका – यांनी तपासणी करावी , तसेच धान्यांचा दर्जाही तपासावा , असे सांगीतले .

पासष्ट हजार घरांना नाव नाही

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नाशिक विभागात 65 हजार घरांची बांधकामे पूर्ण झालीत , पण मला एकाही घरावर पंतप्रधान आवास योजना असे नाव दिसले नाही , असे का होतेय , तरतूदीप्रमाणे प्रत्येक धरांवर नाव हवे , तातडीने नावाची व्यवस्था करावी , अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा सज्जड दम ना . पवार यांनी अधिका यांना दिला .

प्रमाणपत्र घोटाळयात हयगय नाही

नाशिकमध्ये अलिकडेच जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला , याविषयी कोणाचीही हयगय केली जाणार नाही , कोणचाही वशिला असोत , कारवाई होणे अटळ आहे , ही नाशिक जिल्हयासाठी गंभीर बाब आहे . केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याच्या जिल्हयात असे होत असेल तर ते निश्चितच अशोभनिय असल्याचे ना . पवार यांनी म्हटले .

लम्पी जणावरांचे दूध उकळून घ्यावेत

नाशिक जिल्हयात तिन कोटींची लम्पी आजाराची लस उपलब्ध आहेत . जवळपास बेचाळीस हजार जणवरांना लस दिली आहे . लम्पी आजाराची लागण झालेल्या जणावरांचे दूध उकळून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले .

- Advertisment -

ताज्या बातम्या