Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रऑनलाईन कामकाज बंद, आजपासून खंडपीठात प्रत्यक्ष सुनावणी 

ऑनलाईन कामकाज बंद, आजपासून खंडपीठात प्रत्यक्ष सुनावणी 

औरंगाबाद- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. त्यातही केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होत होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी काढलेल्या आदेशानुसार, औरंगाबाद खंडपीठात आजपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.

सकाळी साडेदहा ते दीड व दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत सुनावणी सुरू असणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत खंडपीठाच्या न्यायमूर्तींचे सुनावणी संदर्भाने वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयीन कामकाजात सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन केले जात होते. मात्र, ऑनलाइन पद्धतीने न्यायालयीन कामकाजाची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या