नवी दिल्ली :
पूर्व लडाख भागात चीनसोबत सुरु असलेल्या सीमावादावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या काही कागदपत्रांचा हवाल देत ही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून हटवण्यात आली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्टिवट करत केला. या कागदपत्रानुसार, चिनी सैनिकांनी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारतीय क्षेत्रावर घुसखोरी केली, हे पहिल्यांदाच अधिकृतरित्या हे स्वीकाराले आहे.
- Advertisement -
वेबसाईटवरून कागदपत्रे हटवल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. वेबसाईटवरून कागदपत्रे हटवल्याने तथ्य बदलणार नाही’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.