Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रनाना पटोले पुन्हा वादात : गांधी हत्येसंदर्भात गोडसेंची भाषा, म्हणाले...

नाना पटोले पुन्हा वादात : गांधी हत्येसंदर्भात गोडसेंची भाषा, म्हणाले…

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीबद्दल (Mahatma Gandhi) एका कार्यक्रमात बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांची जीभ घसरली. त्यांच्या गांधी हत्येसंदर्भातील वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करतांना नाना पटोले यांनींच महात्मा गांधींचा वध झाला असे शब्द वापरले आहेत. काँग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध अश्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलाय आहे.

- Advertisement -

भाजप आक्रमक

नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. नाना पटोले यांना बोलताना भान राहत नाही, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. नाना पटोलेंच्या पोटातील ओठावर आले का? असा प्रश्न भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या