त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती (Swami Sagarand Saraswati) यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन (passed away) झाले. त्यांच्या निधनानंतर विवध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे…
त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील गणपतबारी परिसरात असणाऱ्या सागरानंद आश्रमात जाऊन सागरानंद सरस्वतींचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, यावेळी सागरानंद यांच्या कार्याची माहिती महंत शंकरानंद सरस्वती (Shankaranand Saraswati) गणेशनंद सरस्वती महाराज तसेच माजी नगराध्यक्ष कैलास घुले (Kailas Ghule) यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. याप्रसंगी विविध आखाड्याचे साधू-महंत उपस्थित होते.