नाशिक | प्रतिनिधी Nashik
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला आजच सोडणार असल्याचे जाहीर केले होते.
- Advertisement -
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले आहे. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचे दिसून आले. ‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…’ असे भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’कडे जाताना ठाकरे असे बोलले आणि निघून गेले. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचे पाहायला मिळाले.