नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उद्यापासून पुढील ४ दिवस म्हणजेच गुरुवार दि.२८ पर्यंत संपूर्ण विदर्भ, खान्देशसह मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात पुन्हा उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवेल. देशात शनिवारी (दि.२३) जळगांव येथे सगळ्यात जास्त ४४ डिग्री कमाल तापमान नोंदवले गेले....
तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून पुढील चार दिवस म्हणजे गुरुवार २८ पर्यंत गडगडाटसह तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची (Rain) शक्यता जाणवते, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे.