मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीला राज्यसभेपाठापोठ विधान परिषदेला देखील मोठा झटका बसला आहे.
- Advertisement -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार जोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आज निकाल दिला. परंतु मलिक-देशमुख आपल्याला मताचा अधिकार मिळावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.