Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याइडीशी बोलू नको ते तुला बिडी प्यायला लावतील

इडीशी बोलू नको ते तुला बिडी प्यायला लावतील

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

महाविकास आघाडीचे मंत्री अनिल परब (minister anil parab) यांच्यासोबत संजय राऊत (mp sanjay raut) यांनाही अटक होईल अशी भीती त्यांना वाटते आहे. त्यामुळे संजय राऊत बिथरले आहेत. एकेरी भाषेत राउतांचा उल्लेख करत ‘त्याची लायकी आहे का?’ अशा शब्दांत राणेंनी टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते….(Union minister narayan rane press conference)

- Advertisement -

ते म्हणाले, किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत असे राणे म्हणाले. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे त्यांचे येणाऱ्या काळात संपूर्ण घोटाळे बाहेर काढणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना कसली भीती वाटते आहे, ते वेळोवेळी भाजपवर आरोप का करता आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एका वर्तमानपत्राचे संपादक असताना संजय राऊत यांनी बाळासाहेब, उद्धव यांना रस्त्यावर आणेल असा लेख लिहिला होता. यासोबतच राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेने राष्ट्रवादी, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेच्यादेखील बातम्यांचे मथळे वाचून दाखवले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील (Maharashtra) सर्वात लाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief minister udhav thackeray) असल्याची टीका राणेंनी केली. शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीका केली तर त्यास जशास तसे उत्तर म्हणून पुरावे इडीकडे दिले जाईल असेही राणे याप्रसंगी म्हणाले.

संपादकाच्या तोंडी अशी भाषा शोभते का? संजय राऊतांना कसली भीती वाटतेय? तसेच जागतिक पत्रकार परिषदेला किती गर्दी होती ओ? नाशिकच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त याठिकाणी कोणीही नव्हते. नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत म्हणून त्यांनी बोलवलेलेच लोकं याठिकाणी आले होते असेही आरोप राणे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या