<p><strong>मुंबई । प्रतिनिधी Mumbai</strong></p><p>राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यातील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.</p>.<p>बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट, इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई देणे, यासाठी रोग नियंत्रणाच्या आँपरेशनल कॉस्ट अंतर्गत १ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले आहेत,असे केदार यांनी सांगितले.</p><p>आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे प्रती पक्षी २० रूपये , आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी ९० रुपये, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी २० रुपये, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी ७० रुपये, कुक्कुट पक्षांची प्रती अंडी ३ रुपये,</p><p> कुक्कुट पक्षी खाद्य प्रती किलोग्रॅम १२ रुपये, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक ३५ रुपये, सहा आठवड्यावरील बदक १३५ रुपये, अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील कुक्कुट पालकांना नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचे केदार म्हणाले.</p>