Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या‘भारत जोडो’ यात्रेचा आज समारोप

‘भारत जोडो’ यात्रेचा आज समारोप

श्रीनगर । वृत्तसंस्था Shrinagar

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा समारोपआज सोमवारी काश्मीरमध्ये होत आहे. यानिमित्त श्रीनगरमध्ये एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सम विचारसरणी असलेल्या 21 पक्षांना समारंभाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यापैकी 12 विरोधी पक्ष समारंभात सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

समारंभासाठी 21 राजकीय पक्षांना आमंत्रित करण्यात आले असले तरी त्यापैकी काही राजकीय पक्षांचे नेते सुरक्षेच्या कारणाने समारंभात सहभागी होणार नाहीत. त्यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), विदुथलाई चिरुथायगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित समारंभात सहभागी होणार आहेत.

खर्गे यांचे शाहांना पत्र

सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाकडून चुका झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरमधील भारत जोडो यात्रेसाठी पुरेशी सुरक्षा पुरवावी, अशी मागणी खर्गे यांनी केली आहे.

लाल चौकात फडकवला तिरंगा

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपाआधी काल रविवारी दुपारी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी आतापर्यंतचे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतरचे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सकाळी काही किलोमीटर चालले. त्यानंतर दुपारी 12 वाजता ते लाल चौकात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी-वाड्रा आणि इतर कांग्रेस नेते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या