नाशिक | प्रतिनिधी Nashik
अडीच वर्ष महाविकास आघाडीने आत्तापर्यंत उत्तम कारभार केला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने त्यांच्या समवेत असलेले विधानसभेचे आमदार महाराष्ट्रात आल्या नंतर वस्तुस्थिती समोर येईल, असे राष्टवादी काँँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
- Advertisement -
आम्ही सरकार टिकविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असून महाविकास आघाडी सदैव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे असे ही पवार यांनी सांगितले.