मुंबई:
मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा या हत्येत हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हिरेन हत्येप्रकरणात पहिल्यांदाच अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अटक केलेल्यात एक माजी पोलीस अधिकारी आणि एक सामान्य व्यक्ती आहे. या दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.या दोघांच्या अटकेमुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ उकलले जाणार आहे. त्यामुळे एटीएस पथक काय खुलासा करतो हे पाहण्याचे ठरणार आहे.
तपास एनआयएकडे
प्रकरणाचा पुढील तपास हा एनआयए तपास यंत्रणा करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयए दाखल करावा, असे आदेश दिले आहे. या बद्दल गृहमंत्रालयाने याबद्दल नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.