केवळ ७८ शेतकरी कुटुंबियांना मदत

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

राज्य सरकार करोना संकटाशी दोन हात करत असताना शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही देखील चिंतेची बाब बनली आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या काळात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये 250 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये शासकीय मदतीला 78 शेतकरी आत्महत्या प्रकरणे मदतीस पात्र तर 98 शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरले आहेत. तर 74 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा चौकशी अहवाल अजून प्रलंबित आहे.

बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटाला नेहमीच सामोरे जात असतो. सावकाराचा त्रास, सोसायट्यांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टी, मालाला हमी भाव न मिळणे, कौटुंबिक सामाजिक अडचणी यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. नाशिक विभागाचा विचार केला तर चालू वर्षात पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत 250 शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे.

शासकीय मदतीला पात्र 78 शेतकरी शासनाने अधोरेखित केले असून 74 शेतकरी कुटुंबियांच्या चौकशी रेड झोन वर आहेत. शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यासाठी जलद कार्यवाही सुरू केली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये ही कार्यवाही धिम्या गतीने चालू आहे. शासनाच्या विविध योजनांची मदत मिळावी म्हणून सध्या पाचही जिल्ह्यात 2015 ते आजपर्यंत आत्महत्या केलेल्या 2338 शेतकर्‍यांचा सर्वे केला जात असून त्याचा अहवाल येत्या आठ दिवसात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

98 प्रकरणे अपात्र

नाशिक जिल्ह्यात 9, धुळे जिल्ह्यात 13, नंदुरबार 3 जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात 20 व अहमदनगर जिल्ह्यात 53 असे एकूण 98 शेतकरी कुटुंबे शासनाने अपात्र म्हणून घोषित केले आहे.

‘उभारी’चा उद्देश

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यात ‘उभारी’ नावाचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आत्मनिर्भर करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *