Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशपाच राज्यात सत्ता कोणाची आज फैसला

पाच राज्यात सत्ता कोणाची आज फैसला

नवी दिल्ली

गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.

- Advertisement -

न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी घेतला हा निर्णय

दुपारी 12 वाजेपर्यंत या पाचही राज्यात कुणाची सत्ता येणार याचा अंदाज येणार आहे. पुद्दुचेरीचा संपूर्ण निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. इतर चार राज्यांचे संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी रात्री उशिर होऊ शकतो.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. बहुमतासाठी १४८ चा जादूई आकडा गाठावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २११ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ४४, डाव्या पक्षांना २६ आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

तामिळनाडूत

तामिळनाडूत २३४ जागांसाठी एक टप्प्यात मतदान झाले. राज्यात एआयडीएमकेची सत्ता आहे. पलानीस्वामी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत एमआयएडीएमकेच्या आघाडीने १३४ जागा जिंकल्या होत्या. डीएमकेला ९८ जागा मिळाल्या होत्या.

केरळ

केरळमध्ये १४० जागांसाठी एका टप्प्यात मतदान झाले. बहुमतासाठी ७१ आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या एलडीएफने ८३ जागांवर विजय मिळवला होता तर यूडीएफने ४७ जागा जिंकल्या होत्या.भाजपचा एका जागेवर विजय झाला होता.

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीमध्येही ३० जागांसाठी मतदान झाले. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा१५ आहे.

आसाम

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका झाल्या. आसाममध्ये १२६ जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजप ६१ जागांवर विजयी झाली होती. एजीपी १४ तर बीपीएफ १२ जागांवर विजयी झाली होती. तिन्ही पक्षांच्या युतीला ८७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या युतीला ३९ जागा मिळाल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या