Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकरोना लढ्यात राजकारण नको

करोना लढ्यात राजकारण नको

मुंबई । प्रतिनिधी

करोना विरुद्धच्या राजकारण न करण्याचे आवाहन करतानाच यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. ठाकरे यांची ही विनंती म्हणजे भाजप नेत्यांबद्दल ठाकरे यांनी मोदींकडे केलेली अप्रत्यक्ष तक्रार मानली जात आहे.

- Advertisement -

संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यातून ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती ठाकरे यांनी केली.

हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के एंटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गेल्या वर्ष- सव्वावर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधीच तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला आणि कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे, असे ठाकरे म्हणाले.

मागणीनुसार लस पुरवठा लगेच व्हावा

मुख्यमंत्री म्हणाले की, प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत.

१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामूळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. २५ वर्षापुढील सर्वाना लसीकरण गरजेचे आहे, या मागणीचा पुनरुचारही उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या