नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
नाशिकरोड (Nashikroad) परिसरात पार पडत असलेल्या शास्रार्थ सभेत पुन्हा एकदा राडा झाला आहे. पोलिसांनी (Police) महंतांना सभेतून बाहेर काढले आहे. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे…
अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjaneri) येथील हनुमान (Hanuman) जन्मस्थळाचा वाद पेटलेला असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्रार्थ सभेतमध्ये (Shasrartha Sabha) अभूतपूर्व राडा झाला.
दोन्हीही बाजूच्या साधू महंतांमध्ये हमरीतुमरी झाली. वादाचे पर्यवसान टाळण्यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महंतांना घटनास्थळावरून सुरक्षित स्थळी नेले. यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांनी कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्यावर रोष व्यक्त केला. तसेच गोविंदानंद सरस्वती यांनीदेखील आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे याठिकाणी मोठा तणाव झाला.
हनुमान जन्मस्थळ प्रकरण : महंतांच्या वादावर पडदा; शास्रार्थ सभेला अखेर सुरुवात
श्री अनिकेतशास्त्री देशपांडे (महंत) यांच्या महर्षी पंचायतन सिद्धपीठम् नाशिकरोड येथील आश्रमात हनुमान जन्मभूमीवर शास्त्रोक्त चर्चा आज आयोजित करण्यात आली होती. या धर्मशास्त्र सभेच्या अंती काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून असतानाच आज कुठलाही निर्णय हनुमानाच्या जन्मस्थळाबाबत झालेला नाही.