Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या"उद्वस्थ ठ....ने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा?; अमृता फडणवीसांचा खोचक शब्दांत...

“उद्वस्थ ठ….ने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा?; अमृता फडणवीसांचा खोचक शब्दांत निशाणा

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.

- Advertisement -

सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थीवर भाष्य करत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांनी शिवसेनेवर व ठाकरे सरकारवर दोन ट्विट करत अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

‘शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

पहिल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हंटल आहे की,

थोडक्यात उत्तर द्यावे;

(उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किंवा सर्व पर्याय निवडून धावे)

उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ?

१ वसुलीच्या ताब्यात

२ विकृत अघाडीच्या ताब्यात

३ लोड shedding च्या ताब्यात

४ Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात

५ गुंडांच्या ताब्यात

तर दुसऱ्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘बाळा साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करूँ तो साला, character ढीला है !’ असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

‘त्या’ जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

दरम्यान अमृता फडणवीस यांनी शनिवारी रात्री केलेलं एक ट्वीट करून पुन्हा डिलीट केलं. त्यावरून ट्विटरवर मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावर त्यांनी हे ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या