अजित पवारांची मोठी घोषणा : राज्यातील १५ हजार रिक्तपदे भरण्यास मंजुरी

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईः

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (monsoon session) सोमवारपासून सुरु झाले. अधिवेशनच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी विरोधकांनी बहिष्कार टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली प्रतिविधानसभा भरवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

काल फडणवीस यांनी एमपीएससी (mpsc) परीक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी विधीमंडळात स्वप्निल लोणकरची (swapnil lonkar) सुसाईड नोट वाचली. ४३० विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे, हा मुद्द ‌उपस्थित करत एसपीएससीच्या कारभारावर टीका केली. विरोधक आक्रमक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार असल्याचे जाहीर केले.

मंगळवारी विरोधक ‌‌‌उपस्थित नसतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले "राज्यात किती रिक्त पद आहेत? तसेच किती नियुक्त्या रखडल्या आहेत? याची माहिती घेऊन प्रलंबित परीक्षांचे निकाल तातडीने लावले जातील. याचसोबत रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे. २०१८ पासून प्रलंबित असलेली अ, ब आणि क अशा ३ गटांमध्ये मिळून १५ हजार ५०१ पदं भरण्यात येतील."

ज्या विभागांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे अशा विभागांना रिक्त पदे भरण्याची मान्यता वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार गट अ मध्ये 4 हजार 417, गट ब मध्ये 8 हजार 031 आणि गट क मध्ये 3 हजार 063 अशी एकूण 15 हजार 511 अशी तीन संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही श्री. पवार यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

स्वप्निल लोणकर (swapnil lonkar)या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली.एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com