श्रीनगर
देशात दिवाळीचा उत्सव सुरु असतांना पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावेळी गोळीबारात BSF चे ३ जवान शहीद झाले असून चार नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारास भारताने उत्तर दिले. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे आठ जवान मारले गेल्याचे वृत्त आहे.
केरन सेक्टरमध्येही पाकिस्तान मोर्टारने बॉम्ब हल्ला करीत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आतापर्यंत पाकिस्तानकडून तीन भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. भाडीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इझमार्ग भागात दुपारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. यानंतर पुढील काही मिनिटात कुपवाडा जिल्हात गोळीबार झाला. पाकिस्तानी आर्मीने युरी सेक्टरमधील बारामुल्लाच्या दिशेने गोळीबार केला
भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत असून त्यांचे आठ सैनिक ठार केले आहेत. याशिवाय त्यांचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठं नुकसान केलं आहे. अनेक दहशतवादी तळांनाही यावेळी भारतीय लष्कराकडून टार्गेट करण्यात आलं. दरम्यान स्थानिकांध्ये भीतीचं वातावरण असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.