दिल्ली | Delhi
विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly elections) हिंसाचाराचा सामना करणाऱ्या बंगालमध्ये (West Bengal) पुन्हा एकदा तोच टप्पा सुरू होताना दिसत आहे. बंगालमधील बीरभूममध्ये (Birbhum) TMC नेत्याच्या (Murder) हत्येनंतर सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला.
या हिंसाचारात मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या जमावाने १०-१२ घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. यात १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत जाळले आणि मरण पावले. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, TMC चे नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला. भादू यांच्या मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी संशयितांच्या घरांना आग लावली. पोलीसही याला राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण असल्याचं म्हणत आहेत.